san-sanskruti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
san-sanskruti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

गुरूबिन कौन बतावे वाट , बडा बिकट यमघात !

                            
                                                       
संत कबीरांनी गुरूंचे महत्व सांगताना या ओळी लिहिल्या ,माणूस जन्माला आल्यावर १ ला गुरु त्याची आई मग वडील , शाळेत शिक्षक ,नंतर महाविद्यालयातले
शिक्षक म्हणजेच कोणतेही ज्ञान शिकवणारा प्रत्येक हा आपला गुरु आहे."गुरु"या शब्दाचा अर्थच मुळी असा आहे , कि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा स्वयन्प्रकाश  आहे
जीवनात आपले दीक्षागुरु, मोक्षगुरू .मंत्रागुरू,योगगुरू असे निरनिराळे गुरु असू शकतात.आपल्या भारतीय अध्यात्मिक इतिहासात नाव घेण्यासारख्या काही जोड्या झाल्या
.निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर ,समर्थ रामदास-कल्याणस्वामी , रामाक्रीष्ण ,  स्वामी विवेकानंद, इत
       आपण सर्वसामान्य माणसे  या महान व्यक्तींचा नुसता आदर्श जरी डोळ्यासमोर ठेवून वागलो तरी आपल्या आयुष्यात बदल होईल. आपण खरेच प्रामाणिक प्रयत्न
केले आणि सद्गुरुप्राप्तीची तळमळ असेल ,ओढ असेल तर सद्गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही, हे नक्कीच !या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा  असेही म्हणतात.या दिवशी व्यासांची पूजा करतात
आपल्या गुरुन्बाद्धालची  निष्ठा सतत जागरूक ठेवण्याच्गुरुंचे स्मरण करण्याच,आणि आपले जीवन सुधारण्याचा हा मंगलदिन आहे.जमत असेल तर या दिवशी रुद्राभिषेक करावा
.व गुरुणा वस्त्र, दक्षिणा द्यावी व्यासांच्या पूजेसाठी पूर्वी आद्यगुरु श्रीक्रीष्णा, व व्यास यांची षोडशोपचारे पूजा करत. पण हल्ली फारशी हि पूजा कोणी करत नाही,त्याऐवजी
आपल्या जीवनास वळण लावणाऱ्या व्यक्तींच्या नवे सुपार्या मांडून त्यांचे पूजन करणे जास्त योग्य ठरते.मोक्ष गुरु जरी एकच असला तरी साध्नागुरू,दीक्षागुरु,संथागुरू ,
प्रपंच गुरु .अनेक असतात.
        काही वेळा आपल्या विरोधात असणारे हि आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपला द्वेष करणारे ,आपला शारीरिक व मानसिक छळ करणारेही आपल्याला या जीवनाची दुखद
अवस्था सांगून जातात. ते सुद्धा आपले गुरूच असतात. हि विशाल दृष्टी म्हणजेच खर्या अर्थाने व्यास(विशाल) पूजा आहे.आणि ती दृष्टी  मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यासपूजा होणे आवश्यक वाटते.
शक्य झाल्यास आपल्या गुरुणा भेटून नमस्कार करावा,त्यांना भेटवस्तू द्यावी. पण व्यावहारिक दृष्ट्या त्यात अडचण असेल तर त्यांचे मनात स्मरण करावे .
        अशा रीतीने आपल्या आयुष्याला वळण लावणाऱ्या गुरुंना आठवण करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्याच आहे,
                                                   गुरुर्ब्र्हाम्ह : गुरुर्विष्णु  गुरुर्देवो महेश्वर :
                                                   गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवा नमः :
        असे म्हणून आपण आपल्या गुरुंपुढे नतमस्तक होऊया.



madhvi dani 



danimadhvi@gmail.com



“गुरुपोर्णिमा”.



 आषाढी पोर्णिमा
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे मने हिरवी असताना जी आषाढाची पोर्णिमा येते ती असते गुरुपोर्णिमा. गुरु पौर्णिमेचा काळ ठरवायचा तर महाभारतापर्यंत मागे जावे लागते. या दिवशी व्यास पूजा करायची प्रथा आहे.महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात.महर्षी व्यास हे शंकराचार्याच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासापासून अशी धारणा आहे. व्यापक दृष्टीने पहिले तर व्यास हि व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे. हि शक्ती गुरुपोर्निमेच्या मध्यरात्री फिरून कृपेचा अभिषेक करते अशी धारणा आहे. प्रत्येक गुरूच्या अंगी व्यासाचा अंश असतो असे मानून गृपोर्निमेच्या दिवशी गुरूला वंदन केले जाते. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला गुरूचा महिमा बोलका आहे... सद् गुरुसारखा असता पाठीराखा....!इतरांचा लेखा कोण करी...!!
काही नाती रक्ताची असतात. पण काही रक्तापेक्षाही  घटट असतात. त्यातलं एक मैत्रीच, दुसर गुरु-शिष्याच. आयुष्यात मित्र असेल तर सोन्याला सुगंध जणू... पण मित्र आयुष्याला अर्थ देईलच असे नाही. ते काम गुरुच. गुरु नेमक करतो तरी काय? तर गुरु दृष्टांत देतो. उत्कर्षाची वाट दाखवतो. आयुष्याला अर्थ देतो. संगीताच्या घराण्यात भास्कर बुवा वखले, भीमसेन जोशी यांनी गुरुकडे पडतील ती कामे केली. मुस्लीम गुरुकडे हिंदू शिष्य गुरुकुल पद्धतीने वाढले. शिष्योत्ताम्माना योग्य पातळीवर येण्यापूर्वी जे कराव लागल त्याला रेगिंग म्हणून कसं चालेल? तोच तर जीवनानुभव असतो आणि तो गुरु कडे मिळतो. कुठलीच विद्या स्वस्तात मिळत नाही. त्याच परंपरेत एकलव्य सारख्या धनुर्धाराला आपला अंगठा द्यावा लागला, तर विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाला आपल्या गुरूच्या रक्षणासाठी युद्ध करावे लागले.
गुरुपोर्णिमा हा कोणता सण नाही जो साजरा करण्यासाठी गुरूला हार, फुले, फळ, पैसे किवा कपडे दिले जातात. तर ह्या पवित्र दिवशी खऱ्या मनाने गुरूला साम, दाम, दीक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मनःशांती, खरेपणा, उदारपणा, पवित्रपणा, चारित्र्य, चांगले वागणे आणि आत्मसमर्पण ह्यासारखी १५ प्रकारची फुले श्रद्धेने अर्पण केली जातात. गुरूला आपल्या संस्कृती मध्ये देवाचे स्थान दिले गेले आहे. ज्या आद्य शक्तीची ह्या दिवशी पूजा होते ते महर्षी व्यास म्हणजे महाभारताचे कवी, ज्यांनी खुद्द विद्यापती गणेशालाच लेखनिक बनवलं. व्यासोचछीष्टमं जगत सर्वं !असा ज्यांचा गौरव होतो त्या महान गुरूला, त्या आद्य शक्तीला माझा कोटी-कोटी प्रणाम !!!!!
GURU is Shiva without his three eyes!
Vishnu without his four arms! Brahma without his four head!
He is Param-Shiva himself in Human Form!!!

Sheetal Pote sheetalpote4475@gmail.com
Sheetal Pote

वटपोर्णिमा

  


          आपल्या हिंदू संस्कृतीत व्रताना खूप महत्व आहे.पूर्वींच्या तुलनेत सध्याची स्त्री हि अधिक सुशिक्षित झाल्यामुले वेल आणि पैसा यांना महत्व येऊन व्रतांचे महात्म्य कमी झाले.आज
'लीव इन रिलेशनशिप "चा जमाना आहे. त्यामुळे वटपौर्णिमा कालबाह्य ठरते आहे.दुर्दैवाने या व्रतांमागील नेमका हेतू विधी आणि फळ याची माहिती नसल्याने व्रत म्हणजे उपवास व पूजा अशीच संकल्पना धृढ होते आहे.उपवास म्हणजे भरपूर फराळाचे पदार्थ खाणे व पूजा म्हणजे अवडंबर माजवून दिखावा करणे,यामुळे आधुनिक पिढीला त्यातील महत्व कळत नाहीये.असो. कुठल्याही व्रताची ५ अंगे आहेत. संकल्प,पूजा, उपवास, दान व विशिष्ट आचार,हि होत.कोणत्याही व्रताची सुरवात संकल्पानेच करावी.व्रताच्या दिवशी फलाहार करावा .पण फलाहाराचे भ्रष्ट  रूप फराळ होऊन रोजच्या जेवणासारखे पदार्थ खाल्ले जातात. हे सर्व पदार्थ पित्त वाढवणारे  व पचनाला जड असल्याने त्याचा त्रासाच होतो.हि व्रते करताना आपल्या  पूर्वजांनी वयाचाही विचार केला आहे .सर्वसाधारण ५०  वर्षापर्यंतच व्रते आचरावी. एकदशि सारखे व्रत मात्र शेवटपर्यंत केले जाते.खर म्हणजे पती-पत्नीचे एकमेकवर खरे प्रेम असेल तरच वटपौर्णिमा साजरी करण्यात अर्थ आहे.दोघातील स्नेहबंध धृढ करणारा असा हा सण आहे.
            सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्यासाठी यामराजना आपल्या भक्तीने संतुष्ट करून आपल्या पतीचे प्राण परत्र मिळविले. अशी आख्यायिका पुराणात आहे,
                                                                             करुनी निश्चय मनासी,नारद बोले सावित्रीसी;
                                                                              ज्येष्ठमास त्रयोदशी ,  करुनी पूजन  वदासी ;
                                                                               त्रिरात्र व्रत करुनी,     मागे औष्य चुड्यासी;
                                                                                येईल यम छालावाया ,शरण जी तयापासी.............
            वटसावित्री व्रताची सुरवात पौर्णिमेच्या आधी दोन दिवस होते. सौभाग्य मीळो   ; वटवृक्षाप्रमाणे  कुल वाढो;अशी भावना या व्रतामागे असते.  प्रत्येक दिवशी १०८ प्रमाणे ३ दिवस वडाला प्रदक्षिणा घालतात. ३ दिवस उपवास करतात.पण कालमानानुसार यात बदल झाला आहे.हे व्रत १ च दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी केले जाते.
            पुजेची तयारी करताना हिरव्या बांगड्या,कापुर, पुजेची कापसाची गेजवस्त्रे,  गळेसर ,विड्याची पाने,सुपारी ,पैसे,पंचामृत व गुलखोब्रर्याचा नैवेद्या ५ आंबे ,दुर्वा वगै. इत्यादी साहित्याची तयारी ठेवावी.
प्रत्यक्ष पूजेला सुरवात करताना प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. हळद -कुंकू ,गंध ,लाल फुल अक्षता यांनी गणपतीची पूजा झाल्यावर वादाची किंवा वादाचे चित्र असणाऱ्या कागदाची पूजा करावी.
या दिवशी उपवास करावा.  वाडापुढे आंबे व पैसे ठेवावे.५ सवाष्णीची आंबा व गव्हाने  ओटी भरावी. काही ठिकाणी १ वाण घरात ठेऊन  बाकीची  इतर ४  घरी जाऊन देतात. वडाला ३ प्रदक्षिणा घालाव्या. वडाला गुंडाळायचा दोरा तिहेरी आसतो.विवाहानंतर सुवासिनी असेपर्यंत प्रत्येक स्त्रीने हे व्रत करावे.हे सौभाग्यावार्धक व्रत आहे.
            आधुनिक काळात अगदी जन्मोजन्मी हाच पती मिळावा हे मागणे सयुक्तिक नसले तरी निदान आहे या जन्मात आपल्या सह्चाराच्या विचारांशी मुलांसमोर सहमती दाखवून नंतर सावकाश त्याचे दोष त्याला
समजावता येतात. तसेच वेळ नाही म्हणून वादाची फांदी आणून पूजा करणे हे मुळीच योग्य नाही. ज्या वृक्षाची आपण पूजा करतो त्याच्याच फांद्या तोडून त्यांची पूजा करणे हे हास्यास्पद आहे. त्यासाठी घरी पाटावर
वडाचे चित्र गंधाने काढून त्याची पूजा करावी.या व्रतास "ब्रह्मसावित्रीची पूजा " असेही म्हणतात.
            आपण ठरवले तर फक्त "वटपौर्णिमा" च नाही तर इतर सण उत्सव, व व्रते यांना मुळ स्वरूपाला बाधा  न आणू देता नवे स्वरूप देऊन जपता येतील. भक्तीने केलेली साधी पूजा हि मला पोहोचते.असे भगवंतच  सांगतात. असो .नवीन दृष्टीकोन स्वीकारून हि वटपौर्णिमा आपण साजरी करूया.




madhvi dani danimadhvi@gmail.com  

सण समारंभ साजरे करून ,मराठी बाणा ,जपूया


                                                                          
 करण्या संवर्धन संस्कृतीचे ,मराठी बाणा हा राखावा .
                                                                             


सण समारंभ साजरे करून ,जपूया हा" अमोल ठेवा " वर म्हन्त्ल्याप्रमाणे मराठी सण व संस्कृतीचे एंकमेकांशी अगदी जुळ्याचे नाते आहे असे म्हंटले तरी चालेल.चैत्र महिन्याच्या १ ल्या दिवशीच्या "गुढीपाडव्यापासून"ते फाल्गुनातील होळी पौरनिमेपर्यंतप्रत्येक सण हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपले सण पूर्वजांनी अशा पद्धतीने  आखले आहेत कि प्रत्येक सणाशी आपले आरोग्य कसे चांगले राहील ,आपल्या जगण्याशी निगडीत गाय ,बैल ,साप यासारख्या प्रण्यांविशायीची कृतज्ञता कशी जपली जाईल किंवा पुर्वाजान्विशायीची कृतज्ञता पुढच्या पिढीने कशी व्यक्त करावी याचाही विचार झाला आहे.आपले सहा ऋतू तसेच उन्हाळा, पावसाळा ,हिवाळा या कळत आहार कसा असावा ?व त्याचा मेळ सणाशी घालून तो कसा जनमान्य करता येईल हे पहिले,गेले.घरातील लहान मुल ते वृद्ध प्रत्येकाला कसे सामावून घेता येईल हे हि पहिले गेले.           
वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा कादुनिम्बाची पाने व गूळ खाउन व गुढी उभारून साजरा करताना संपूर्ण घराचे आरोग्य व आनंद जपला गेला तर आषाढात पोटाचे आरोग्य जपण्यासाठी .आषाढी इकादशी असते, वास्तविक आपण करतो ती इकादशी दुप्पातखाशी असते.पूर्ण दिवस लंघन करणे हा खरा उपास व तो आरोग्यकारक हि आह"गुरु पौर्णिमेला "आपल्या गुरुजनान्विशायीची कृतज्ञता व्यक्त करतो."नागपंचमीला नागाची पूजा करतात कारण  शेतकऱ्याला शेताची नासधूस होऊ नये यासाठी त्याचे महत्व मानले गेले,""नारळी पौर्णिमेला बहिण भावाला राखी बांधून आपले रक्षण करण्यास सांगते .तर कोळी बांधवांचे जीवनच ज्या सागरावर आवलंबून आहे त्यालाही नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विश्रांती असते गणपती आणि दिवाळी हे तर मुख्य सण!त्यात नवरात्रही आलेच !या मोठ्या ३स नामधून मराठी संस्कृतीचे वैभव  दिसून येते. छोट्याश्या उंदराचे वाहन करून जेवा गणपती घरी येतो तेव्हा बालगोपालांच्या आनंदाला पारावार राहत नाही त्या प्रसंन्तेला विसर्जन  करून परत आल्यावर किती उदास होतो आपण?"नवरात्र" हे स्त्रीशक्तीला पुजण्याचे प्रतीकच!तर होळी पौणिमा हे सर्व आमंगाल्तेला नसतं करण्याचे!शिवाय हरतालिका वटपौर्णिमा यासारखे सण हे निसर्गाच्या सानिद्ध्या त  घरातल्या सुवासिनीने जावे यासाठीच खास आहेत.             पण या सणांना सद्ध्या ज्या पद्धतीने साजरे केले जाते ते चुकीचे आहे असे वाटते.            
 आपले सण आपण पूर्वापार पद्धतीने का?व कसे? साजरे करावेत हे आपण समजून घ्यायला हवे नाही का?              
आपल्याला मिळालेला हा संस्कृतीचा संरूपी"अमोल ठेवा" आपणच जतन करायला हवा नाही?