बुधवार, १० ऑगस्ट, २०११

मुला-सुनाशी मैत्री जरी वाढवली, तरीही वृद्धाश्रम,पाळणाघरांची संख्या नाही घटली!



          फेसबुकवर किंव्हा वर्तमानपत्रे व इतर माध्यमातून सद्य कौटुंबिक समस्यान बद्दल खूप चर्चा  सातत्याने वाचायला  मिळते . पाळणाघर आणि वृद्धाश्रमांची गरज ही वाढत आहे. त्यासाठी वृद्धाश्रम आणि पाळणाघरांची संख्या कमी पडत आहे. त्यासाठी सर्व पिढ्यांनी विचार करण्याची गरज आहे.
         पालक आपल्या मुलांचे वयाच्या २६-२७ पर्यंत संगोपन करताना दिसते. काही मूले १०-१२ वि नंतर  पायावर उभे राहून शिक्षण घेतात. आता मुलांचे शिक्षण, नंतर नोकरी किंव्हा व्यवसाय ,नंतर विवाह. आताच पालकांच्या पुढे मुलांनी ठरवून विवाह,प्रेम विवाह ते लीविंग relationship पर्यंत  बदल पाहावे लागले. मूले येथे देशात किंव्हा परदेशात राहिली तरी ती अनेक कारणांमुळे विभक्त राहणे पसंत करतात. नातवानचे  संगोपन आपल्या आई-वडिलांनी करावे,तर तेही या मुलांच्या मर्जीने  असते. ते जेथे राहतील तेथे पालकांनी जायचे स्वतःला अपग्रेड करायचे आणि ते करूनही त्यांना चांगले शब्द किंव्हा मान दिला जात नाही. आताच्या अनेक घरान मध्ये माहेरच्या माणसांची अधिक दखल फूट पाडताना दिसत आहे. मुलाना पालक की पत्नी तर ते पत्नी सोबत म्हणून तिचा विचार अधिक करणे पसंत  करतात . चूक-बरोबर  कोण हे पहिले जात नाही.  आयुर्मान  वाढले  आहे,पालकांना त्यांच्या आई-वडील,सासू-सासरे यानाही बऱ्याच ठिकाणी पाहावे लागत आहे.या सर्व परिस्थितीत  पालक मानसिक खच्ची  होत  आहेत .जरी केली सुनेशी मैत्री, तरी  मुलं-सुनवास होणार नाही याची नाही खात्री!
        गीतेतील  तत्वज्ञान  जेव्हा  खरे  अनुभवायला  लागते ,तेव्हा  कळते  की सांगणे  सोपे  व अंगीकारणे  अवघड  असते. आपल्या पोटच्या  मुलांनी  आपल्याशी  आपुलकीने  बोलावे,चौकशी करावी  या मानसिक  आधाराची  अपेक्षा  तर राहतेच  ना !   मुला-मुलीनी कितीही  वाजता रात्री  घरी येणे,त्यांचे अधिक स्वतंत्र   पणे  वागणे हे  मुला-मुलीना  गैर वाटत नाही. घराचे मंदिर असावे अशा अपेक्षा करणाऱ्यांची कुचम्बना  होते.  काळी वाटते ,त्यावरून वैचारिक मतभेद होतात. पालक व्यसनी असणे मुलांच्या हितकारक नसते,त्यातही आताच्या पिढीचा  स्वार्थीपणा असतो,की त्यामूळे त्यांच्या मुलाना ते कसे सांभाळतील. म्हणजे आईने तुळशीला पाणी घालावे व यांनी दारू ढोसावी ही अपेक्षा असते. वीकएंड संकल्पना आली आहे,त्यात हेच दिसून येते,की तेव्हा यांच्या मुलाना सांभाळले,तर पालक चांगले,नाहीतर ते वाईट. फक्त  स्वार्थाने  संबंध   सुधारू  शकत  नाहीत. त्यासाठी मुलं-सुनांनी  ही  हे आपले  घर  आहे ही भावना बाळगायला हवी. माझे -तुझे हे फार सुरू झाले आहे. तुमचे तेही माझे  आणि माझे ते माझे  हा विचार बरोबर नाही! आई-वडील,घरातील देव कोणी सांभाळायचे हा प्रश्न सगळीकडे उपस्थित होतो आहे. तेथे पालकांनीही देव संकल्पना बदलायला हवी. देव कोणावर लादू नयेत.
           अनेक पालकानच्या  समस्या  मी  पहिल्या  देश  -परदेशात! समस्या खूप चिंताजनक आहेत.  स्त्री अर्थार्जन करायला लागली,तिचेही विचार बदलले. शिक्षण,पैसा आला. त्यामुळे उन्मत्तपणा, अहंकार वाढीस लागले. मुलीना स्वयंपाकघरात जाणे पसंतच नाही,बरे जे करतात त्यांना करतात म्हणावे तर तेथेही केले सासूने म्हणून काय बिघडले असा व्यवहार!  ज्या बाईने सासुरवास भोगला तिला पुन्हा तिच्या चांगुलपणाच्या व्यवहाराने ,सुनेशी मैत्रीच्या नात्याने वागूनही सुनवास भोगावा  लाग्नारयानची  संख्या वाढली,आणि पालक वेगळे राहणे,अलिप्त होणे पसंत करू लागले. व्यक्ती तितक्या प्रकृती,त्यामुळे काही ठिकाणी सासुरवास सुनांना भोगावा लागतो आहे. वेगळे राहिले की ही समस्या सुटते आहे. स्त्री आर्थिक स्वतंत्र झाल्याने सासुरवास प्रकारचे प्रमाण कमी झाले. 
      मान द्यावा आणि घ्यावा हे खरे आहे. मुलाना प्रेम दिले तसेच त्यांना चुका करताना पालक काही गोष्टी सांगतात. दोन्ही गोष्टी  समजून घ्यायला हव्यात. आताच्या पिढीत अरेतुरेत किंव्हा आई-बाबांचे नावच मूले घेतात. आता हे परिवर्तन घडत आहे. त्यांच्या पिढीच्या समस्या अजून वेगळ्या असतील.त्यानाही उमजेल.  
      मुलाना त्यांच्या पद्धतीने जिवन जगू द्यावे,मूले पाश्चात्य संस्कृतीचा त्यांना हवा तेवढाच अंगीकार करतात,असें दिसून येत आहे.कर्तव्यांची जाण त्यांना द्यावी लागत आहे. पालकान मध्ये एकटा पालक असणार्यंची सख्याही बरीच आहे. त्यांच्यावर मूले असताना जवळ नाहीत म्हणून एकटे राहणे,किंव्हा त्यांच्याशी जमवून घेणे हे पर्याय राहतात. अनेक ठिकाणी मुलं होई पर्यंत मूले एकत्र राहतात,आणि जरा मोठी झाली,की वेगळे होतात. या मध्ये भावनांची गुंतवणूक झालेली असते. त्यातून बाहेर पडणे कठीण होते. भविष्य बघून आणि देव-देव करून मानसिक शांतता मिळत नाही,ती स्वत:चे  चिंतन करूनच आणावी लागते. पक्षान प्रमाणे निरपेक्ष पणे जिवन जगणे शिकावे लागते. 
       मुलांनी १६ व्या  वर्षी  आपल्या पायावर उभे राहून स्वतचे शिक्षण पुरे करावे. कोणीही कोणाकडून फार अपेक्षा बाळगू नयेत. पालकांच्याही आर्थिक विवंचना कमी होतील.स्वतः साठी पैसे शिल्लक ठेवू शकतील.  या मूळे मुलेही सुखी आणि पालकही सुखी!  मूले मोठी झाली,आप -आपल्या मार्गाला लागली हे दुरून पाहण्याची पालकांना सवय होईल व मुलानाही सवय होईल. भावनांच्या गुंतवणुकीने सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या भावनांना आवर घालणे व दूर राहून संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करणे हा मार्ग उचित वाटतो. आताच्या काळात पूर्वीचे नियम लागू होवू शकत नाही हे लक्षात आले आहे. 
       आपल्या  संस्कृतीचे सण-उत्सवांचे अर्थ हे कुटुंब-समाज एकत्र कसा राहील,स्नेहभाव कसा वाढीला लागेल या अर्थानी आहेत.पण ते समजून घेण्याची सर्वांची क्षमता हवी!  आपली मानवधर्म सांगणारी संस्कृती आहे . निसर्गाशी जो मैत्री करेल,त्यास जिवन उमजेल. जाणा आपुला स्वधर्म, रुजवा मनी मानवधर्म!
                                                                                                                                                                             मंगला
Mangala Bhoir bhoirmangala@gmail.com
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा